आ लहू कानडेंनी उदघाटन केलेल्या बेलापूर-वळदगाव रस्त्याचे काम 'थर्डक्लास' ; विकास कामांचा 'दिखावा' केवळ पैसे खाण्यासाठीच..! उप-अभियंता रविंद्र पिसे टक्केवारी घेत असल्याने कंत्राटदाराकडून निकृष्ट काम?


श्रीरामपूर ( राजेश बोरुडे ) : श्रीरामपूर मतदारसंघात रस्त्यांच्या कामांचा धडाका सुरु असला तरी कामाचा दर्जा अत्यंत 'थर्डक्लास' आहे. विकास कामांचा केवळ 'दिखावा' सुरु असून रस्त्यांची कामे फक्त पुढारी, अधिकारी व कंत्राटदाराची घरे भरण्यासाठी सुरु असल्याचे दर्जाहीन कामावरून सिद्ध होत आहे. आ लहू कानडेंनी नुकतेच उदघाटन केलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर-वळदगाव रस्त्याचेही काम अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरु आहे. तब्बल ७५ लक्ष रुपये खर्चून होत असलेल्या या रस्त्याच्या बोगस कामाबाबत ग्रामस्थांनीही संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, बेलापूर-वळदगाव रस्त्याच्या कामात उप-अभियंता रविंद्र पिसेंसह रस्त्याच्या कामातील नियुक्त अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतल्याने ठेकेदार बिनदिक्कतपणे दर्जाहीन, निकृष्ट काम करून शासनासह जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप राजेश बोरुडे यांनी केला आहे. रस्त्याचे काम त्वरित थांबवून कामाचे कार्यारंभ आदेश रद्द करून ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार राजेश बोरुडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.


यासंदर्भात राजेश बोरुडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, गटविकास अधिकारी प्रविण सिनारे यांसह ग्रामविकास व पंचायत राज विभागाला निवेदन देऊन श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर-वळदगाव रस्त्याच्या कामात उप-अभियंता रविंद्र पिसे, रस्त्याच्या कामातील नियुक्त अधिकारी, उप-अभियंता यांनी टक्केवारी घेतल्याने ठेकेदार दर्जाहीन काम करून शासनासह जनतेची फसवणूक करत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ २९ सप्टेंबर रोजी आमदार लहू कानडेंच्या हस्ते झाला होता. दरम्यान, सध्या रस्त्याचे काम सुरु असून रस्त्याच्या कामात सुरुवातीपासूनच अत्यंत निकृष्ट मटेरियलचा वापर होत असल्याने लाखों रुपयांचा निधीने केवळ ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांचे खिशे भरले जात असल्याचे राजेश बोरुडे यांनी म्हंटले आहे. जिल्हा परिषद श्रीरामपूर उपविभागाचे उप-अभियंता रविंद्र पिसे यांसह रस्त्याच्या कामातील नियुक्त अधिकारी उप-अभियंता टक्केवारी घेतल्यानेच ठेकेदाराला मनमानी पद्धतीने, अत्यंत निकृष्ट मटेरियलचा वापर करून काम करू दिले जात असल्याचा आरोप राजेश बोरुडे यांनी केला आहे.

रस्त्याच्या कामात कच्च्या खडीचा वापर केला आहे. डांबराचा वापर अत्यंत कमी केल्याने रस्ता लागलीच उखडत आहे. खचत आहे नंतरही खचणार आहे. रस्त्यावरील खडीही हाताने सहज निघत आहे. रस्ता अनेक ठिकाणी खाली-वर असून लेव्हल नाही. रस्त्याची रुंदीमध्ये तफावत असल्याने त्याची तपासणी, मोजमाप केल्यास मोठा घोटाळा उघड होणार असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. रस्त्याच्या बाजुपट्ट्याच्या कामात मोठी अनियमितता आहे. बाजुपट्ट्याचे मोजमाप करावे. साईडपट्ट्याच्या रुंदीमध्येही मोठी तफावत असून बाजुपट्ट्यात मतिमिश्रित मुरामाचा वापर केला असल्याचे राजेश बोरुडे यांनी म्हंटले आहे.

रस्त्याच्या कामात मोठी अनियमितता, गैरप्रकार, भ्रष्टाचार झाल्याने काही दिवसातच रस्ता खचणार आहे, उखडणार आहे. ठिकठिकाणी खड्डे पडणार आहे. या रस्त्यावरून शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थ मार्गक्रमण करतात. वाहतूक व दळणवळनाच्या दृष्टीने प्रमुख रस्ता असल्याने रस्त्याचे काम इस्टीमेंटप्रमाणे, दर्जेदार गुणवत्तापूर्ण होणे गरजेचे असल्याचे राजेश बोरुडे यांनी म्हंटले आहे.

रस्त्याच्या कामातील नियुक्त अधिकारी, उप-अभियंता रविंद्र पिसे यांनी ठेकेदारकडून रस्त्याचे काम इस्टीमेन्टप्रमाणे, नियमानुसार करून घेणे अनिवार्य असताना या अधिकाऱ्यांचे हात ओले झाल्यामुळे ठेकेदाराला मोकळीक देण्यात आली. कामाच्या ठिकाणी संबंधित अधिकारी उपस्थित राहत नाहीत. कंत्राटदार, उप-अभियंता, संबंधित अधिकारी संगणमताने शासनाची फसवणूक करून शासकीय निधीवर डल्ला मारत आहेत.

रस्त्याच्यां कामात खराब मटेरियल वापरल्यास ते काढून घेऊन गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, चांगले साहित्त्या वापरण्याची तरतूद असल्यामुळे व तशा अटी-शर्ती, करारपत्र कंत्राटदारासोबत केलेले असल्यामुळे ठेकेदारावर नियमोचित कारवाई करावी. कंत्राटदाराने या रस्त्याच्या कामात मोठी अनियमितता ठेऊन शासनासह जनतेची फसवणूक केली आहे. थातूरमातुर काम दाखवून रस्त्याचे बिले हडप करण्याचा ठेकेदारासह अधिकाऱ्यांचा डाव असून याची चौकशी व्हावी, असे राजेश बोरुडे यांनी तक्रारीत म्हंटले आहे.


ठेकेदाराला रस्त्याच्या कामाचे कोणतेही देयके अदा करु नये, त्याला काळ्या यादीत टाकावे. कंत्राटदारावर कायदेशीर, दंडात्मक कारवाई करून कामाचे कार्यारंभ आदेश त्वरित रद्द करणायची मागणी राजेश बोरुडे यांनी करून दोषींवर त्वरित कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलन, घेराव, उपोषण करण्याचा इशारा राजेश बोरुडे दिला आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post