मनीष सिसोदिया यांच्या अटकेचा श्रीरामपुरात जोरदार निषेध


श्रीरामपूर : देशातच नव्हे जगात आपल्या अभिनव, कल्पक आणि प्रामाणिक उपक्रमांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्या यांच्यावर खोटे आरोप करत केंद्र सरकारचा पोपट बनलेली केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय यांनी सिसोदिया यांना अटक केली. काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीतील शैक्षणिक क्रांतीबद्दल अमेरिकेतील जगप्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्समध्ये राजधानी दिल्लीतील बदललेल्या प्रगत शिक्षण पद्धतीचे कौतुक करण्यात आले होते, त्याचीच पोटदुखी म्हणून की काय दिवसापूर्वी सीबीआयची धाड मनीष सिसोदिया यांच्या घरावर टाकली होती व त्यांच्यावर खोटे आरोप करत काल त्यांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ श्रीरामपुरात काळ्या फिती लावून, सीबीआयच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात  अमूलाग्र बदल घडवत केजरीवाल सरकारने देशासमोर एक आदर्श सरकारचे उदाहरण प्रस्तुत केले आहे. परंतु, संकुचित राजकारण करणाऱ्या केंद्र सरकारला ते पचनी पडणे कठीणच आहे. म्हणूनच आधी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना खोट्या प्रकरणात जेलमध्ये टाकण्यात आले आणि आता मनीष सिसोदिया यांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. पण अशा प्रयत्नांमुळे आम आदमी पक्षाची आरोग्य - शिक्षण क्रांतीची ज्योत विझण्याऐवजी संपूर्ण भारतभरामध्ये तीव्र वेगाने पसरत आहे. असे प्रतिपादन आप चे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी केले.
सिसोदिया यांना अटक करण्यामागे दिल्ली सरकारच्या नवीन लिकर पॉलिसीमुळे दारू वरील करापोटी मिळणारे उत्पन्न तब्बल ६००० कोटी रुपयांनी वाढले आहे आणि त्यामुळे दिल्ली सरकारला आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, बस सेवा इत्यादी सुविधा देण्यासाठी वाढीव निधी मिळाला आहे. पूर्वी दारूवरील करापोटी मिळणारे उत्पन्न ४००० कोटी रुपये इतके होते. दिल्ली सरकारने नवीन लिकर पॉलिसी लागू केल्यानंतर ते उत्पन्न १०,००० कोटी रुपये इतके झाले आहे.  सरकारच्या तिजोरीमध्ये वाढीव कर आल्यामुळे बेकायदेशीर दारू विकणाऱ्यांचे आणि त्यातून एक हिस्सा मिळणाऱ्या भाजप नेत्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळेच भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे पित्त खवळले असून त्यांनी सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे.
केंद्र सरकार सीबीआय, इडीचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी कशा प्रकारे करत आहे ते आपण महाराष्ट्रात सुद्धा बघतच आहोत.  *परंतु दिल्लीत मोदी सरकारची लढाई प्रामाणिक आम आदमी पक्षासोबत आहे. आमचे हात इतर भ्रष्ट राजकीय पक्षांच्या नेत्यांसारखे दगडाखाली नाहीत. त्यामुळे भाजपला जे करायचे आहे ते करावे आम आदमी पक्ष शरण जाणार नाही. जनतेसाठी आम्ही लढतच राहू. पूर्ण देश मनीष सिसोदिया यांच्यासोबत आहे, असे प्रतिपादन विकास डेंगळे यांनी केले.
"जनताभिमुख केजरीवाल सरकारच्या कामात अडचणी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सीबीआय, ईडी या संस्थांच्या माध्यमातून आपच्या एक एक मंत्र्यांना विनाकारण अडकवू पाहत आहे. याआधी सत्येंद्र जैन आणि आता मनीष सिसोदिया. देशातील जनता मोदी सरकारचा हा कुटील डाव ओळखून आहे, महाराष्ट्रासह संपूर्ण देश मनीष सिसोदिया यांच्या पाठीशी आहे, असे देखील डुंगरवाल म्हणाले.
यावेळी आप चे तालुकाध्यक्ष विकास डेंगळे,  राहुल रणपिसे, ॲड प्रविण जमधडे, भरत डेंगळे, डॉ.प्रविण राठोड, भैरवशेठ मोरे, चेतन भोगे, प्रशांत बागुल, किरण डेंगळे,मीडिया प्रमुख अक्षय कुमावत, ॲड दिनेश यादव,सचिन साळवे, सलीम शेख,सचिन आजगे, महेश कवठळे, हेमंत ताके, देवराज मुळे, महेश रासकर,मनोज बोंबले, मोहन तेलोरे,कुंडलिक लटमाळे, सागर होंडगे, नवनाथ हरिश्चंद्रे, दीपक जाधव, यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post