श्रीरामपुरात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन


श्रीरामपूर :  देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश उभारणीमध्ये अत्यंत मोलाचे योगदान देणाऱ्या गांधी कुटुंबाला सूडबुद्धीने जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेने र्इ.डी. चौकशी च्या कारवार्इ विरोधात आमदार लहू कानडे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.  

यावेळी बोलताना आमदार लहू कानडे म्हणाले की, संपुर्ण देशभर हे लाक्षणिक स्वरुपाचे आंदोलन सुरु आहे. केंद्रातल्या मोदी सरकारला या देशातील गोरगरीब माणसांचे जे प्रश्न आहे, शेतक-यांचे जे प्रश्न आहेत, कष्ट करणा-या माणसांच्या जे प्रश्न आहेत ते सोडवण्यामध्ये अपयश येत आहे, त्याचा परिणाम म्हणून सामान्य जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी केंद्रातील हे भाजपाचे सरकार जातीधमर्माचे राजकारण करुन समाजासमाजामध्ये दुही पेरण्याचे, वैरभाव निर्माण करण्याच अत्यंत विषारी राजकारण करत आहे. या प्रश्नावर संपुर्ण देशभर आपला काँग्रेस पक्ष आवाज उठवतो आहे, त्या काँग्रेस पक्षाचा आवाज बंद करण्यासाठी विनाकारण त्यांच्या हातामध्ये असणा-या ज्या काही यंत्रणा आहे त्यामध्ये सी.बी.आय., र्इ.डी., निवडणुक आयोग असेल अशा अनेक माध्यमातून विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्यासाठी विनाकारण केंद्र सरकार कारवायांच सुडचक्र काँग्रेस पक्षाध्यक्षाच्या विरोधात करत आहेत. आता तर धान्य व दुध, दही, ताक यासारख्या जीवनाश्यक वस्तुंवर त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्यावर वही, पुस्तक, पाटी पेन्सील यासारख्या  शालेय वस्तुंवर देखील जी.एस.टी. लावणारे केंद्रातील पहिले भाजपा निष्क्रीय सरकार आहे.  काँग्रेस सरकारच्या 60 वर्षांच्या काळात उभारलेले व देशाच्या विकासाला हातभार लावणारे व समाजासाठी वरदान ठरणारे देशातील अनेक उद्योग भाजपा प्रणित केंद्रसरकारने मोडीत काढले आहेत. जगातील श्रीमंतांच्या यादीतील बिलगेट्स् सारखे उद्योजकांना मागे टाकून देशाच्या पतंप्रधानांचे मित्र असणारे अदानी हे जगातील श्रीमंतांच्या यादीत अग्रेसर झाले आहेत. 

  गांधी कुटुंब हे शूर योद्धे असून ते कधीही सरकारला शरण जाणार नाही. महागाई, बेरोजगारी , ढासळलेली अर्थव्यवस्था हे अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडून सूडबुद्धीने काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्याविरोधात ईडीच्या कारवाया होत असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नार्इक यांनी केली असून खा.राहुल गांधी व खा.सोनिया गांधी यांना ईडीने पाठवलेल्या नोटीस विरोधात  मध्ये काँग्रेसच्या वतीने आमदार लहू कानडे यांच्या नेतृत्वाखाली शांततामय सत्याग्रह धरणे आंदोलन करण्यात येत आहे.  

ॲड. समीन बागवान यांनी प्रास्तविक केले, यावेळी जिल्हाकाँग्रेस चे  उपाध्यक्ष इंद्र्नाथ पा.थोरात, सरचिटणीस माऊली मुरकुटे, जेष्ठ नेते नगरसेवक अंजुमभाई शेख, माजी नगरसेवक अशोक नाना कानडे, बाबासाहेब कोळसे, मुक्तारभाई शहा, कलीमभाई कुरेशी, विजय शेळके, नगरसेविका जयश्रीतार्इ शेळके, सतीश बोर्डे, आबा पवार, सुरेश पवार, हरिभाऊ बनसोडे, बाळासाहेब तनपुरे, अक्षय नार्इक, नानासाहेब रेवाळे, मच्छींद्र मासाळ, आशिष शिंदे, मुदस्सर शेख, अण्णासाहेब ढोणे, राधाकृष्ण तांबे, मेहबुब शेख,  अभिजीत लिप्टे, अहमदभार्इ शाह, जावेदभार्इ शेख, मुळा प्रवराचे माजी संचालक अशोकभार्इ बागुल, विजय शेलार, र्इम्रान शेख, बाबा भालेराव, विशाल शिरसाठ, आकाश शेंडे, आकाश अडांगळे, संतोष निकम हारुणभार्इ शेख यांच्यासह काँग्रेसच्या सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post