साईकिरण टाइम्स | 20 ऑक्टोबर 2020
अहमदनगर जिल्ह्यात आज ५४१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९१८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.१४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २१९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७८८ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११ आणि अँटीजेन चाचणीत १८२ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३,जामखेड ०१, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०१, पाथर्डी ०२, राहुरी ०१, संगमनेर ०१, श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये , मनपा ०८ आणि श्रीगोंदा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १८२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १५, अकोले २०, जामखेड १०, कर्जत १३, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०४, पारनेर १३, पाथर्डी २९, राहाता १३, राहुरी ११, संगमनेर ११, शेवगाव ०७ श्रीगोंदा ०८, श्रीरामपूर १२, कॅंटोन्मेंट ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ११५, अकोले ३३,जामखेड २३, कर्जत २१, कोपरगाव २१, नगर ग्रा ३६, नेवासा २६, पारनेर ३३, पाथर्डी ३६, राहाता ३२, राहुरी १५, संगमनेर ५२, शेवगाव १४, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर ३१, कॅन्टोन्मेंट ११, मिलिटरी हॉस्पिटल १०,इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.