साईकिरण टाइम्स ब्युरो, 6 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | ओव्हरलोंडींग मळी वाहतूक करणाऱ्या चितळी डिस्टिलरीवर कायदेशीर कारवाई करून मळी वाहतूक बंद करावी, या मागणीसाठी छावा मराठा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण कोल्हे पाटील यांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर भर पावसातही बुधवारी (दि. 5 ) उपोषण चालू होते; आज (दि.6) उपोषणाचा दुसरा दिवस असून कारवाई झाल्याशिवाय उपोषण स्थगित करणार नाही, असा सज्जड इशारा कोल्हे यांनी दिला आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर कालपासून (दि.5) कोल्हे आमरण उपोषणास बसले आहेत. काल भर पावसातही कोल्हे यांचे उपोषण चालू होते. यावेळी कोल्हे म्हणाले की, चितळी येथील जॉन डिस्टिलरीतून दररोज हजारो लिटर मळी टँकरद्वारे ओव्हरलोंडींग करून शेतात व रस्त्याच्या कडेला सोडतात. टाक्याही गळक्या असल्यामुळे रस्त्यावर माळी सांडून अपघात होऊन लोकं मरण पावलेले आहे यांस जबाबदार कोण?? असा सवाल कोल्हे यांनी विचारला आहे. कारखानदारांवर कारवाई कारवाई न करण्याचे कारण काय?? कारखानदार शासनाचे जावई तर नाही ना? असा संतप्त सवाल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. या कारखानदारांडून काही चिरी मिरी तर मिळत नाही ना? असाही प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. कारखानदार सहा-सात तालुक्यात मळी ओव्हरलॉंडींग टँकर करून रस्त्याच्या कडेला शेतात टाकतात या मळीत विषारी घातक द्रवे असतात हे द्रव्य शेतात जिरल्यामुळे जमीन नापीक होते असे कोल्हे यांनी म्हंटले आहे. छावा छात्रवीर सेनेचे राजाराम शिंदे, राजेश बोरुडे, संजय हजारे, जमीर शेख आदींनी उपोषणास सहभागी होऊन पाठिंबा दिला आहे.