![]() |
File photo |
साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 जुलै 2020
बेलापूर (प्रतिनिधी) सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बेलापूर पोलीसांनी कडक पावले उचलली आहे. विनाकारण तसेच मास्क न लावता फिरणाऱ्या दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहीती पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांनी दिली आहे.
बेलापूर व परीसरात कोरोनाचा हळूहळू फैलाव सुरु झाला आहे. लग्न, अंत्यविधी व बाहेर गावहुन येणारे पाहुणे यांचा संपर्क वाढल्याने परिसरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. लोक विनाकारण मास्कशिवाय गावात फिरत आहेत. बेलापूर पोलीसांनी विनाकारण मास्क न लावता दोन जणावर कारवाई केली आहे.
हेही वाचा.....बिबट्याचा शिवसेना नेत्यावर हल्ला
पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हाटले आहे की, रमेश नामदेव होले हा बेलापूर बु. बेलापूर बायपास येथे (MH-17 BH-57 ) या मोटार सायकलवर मास्क न लावताच फिरत होता तसेच विशाल पांडूरंग दिवे (रा. दत्तनगर )हा हीरो होंडा मोटार सायकलवर (MH17 J6627 ) विनामास्क विनाकारण फिरताना आढळून आला. पोलीसांनी दोघावरही भारतीय दंड संहिता कलम 188 व 269 नुसार कारवाई केली आहे. बेलापूर पोलीसांनी गावात व परिसरात रात्रीच्या गस्त बरोबरच दिवसाही गस्त सुरु केली आहे. काही ठिकाणी विनाकारण फिरणाराला उठबशा तर काहींना दंडूक्याचा प्रसाद मिळत असल्यामुळे सायंकाळी पाच नंतर गावात सामसुम दिसू लागली आहे. ग्रामस्थांनी पोलीसांच्या कारवाईचे स्वागत केले असून कोरोनाचा प्रसार थांबावयाचा असेल तर काही कडक नियम करावेच लागणार असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हाटले आहे की, रमेश नामदेव होले हा बेलापूर बु. बेलापूर बायपास येथे (MH-17 BH-57 ) या मोटार सायकलवर मास्क न लावताच फिरत होता तसेच विशाल पांडूरंग दिवे (रा. दत्तनगर )हा हीरो होंडा मोटार सायकलवर (MH17 J6627 ) विनामास्क विनाकारण फिरताना आढळून आला. पोलीसांनी दोघावरही भारतीय दंड संहिता कलम 188 व 269 नुसार कारवाई केली आहे. बेलापूर पोलीसांनी गावात व परिसरात रात्रीच्या गस्त बरोबरच दिवसाही गस्त सुरु केली आहे. काही ठिकाणी विनाकारण फिरणाराला उठबशा तर काहींना दंडूक्याचा प्रसाद मिळत असल्यामुळे सायंकाळी पाच नंतर गावात सामसुम दिसू लागली आहे. ग्रामस्थांनी पोलीसांच्या कारवाईचे स्वागत केले असून कोरोनाचा प्रसार थांबावयाचा असेल तर काही कडक नियम करावेच लागणार असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.