Shrirampur : आरे बाप रे... ...कांद्याच्या चाळीतच बिबटयाने रात्रभर ठोकला मुक्काम

साईकिरण टाइम्स ब्युरो 2 जून 2020
उक्कलगाव| श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील वाकण वस्तीवरील हाकेच्या अंतरावर असणार्‍या संजय शिंदे यांच्या शेतातील शेडमध्ये कांद्याच्या चाळीतच रात्रभर बिबटयाने मुक्काम ठोकला. शेडच्या बाहेरून व आतील बाजूस बिबटयाच्या पावलांचे ताजे ठसे दिसले आहेत. काल व परवा रात्री उक्कलगाव परिसरात संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे,  बिबटयाने रात्रभर कांद्याच्या चाळीत मुक्काम केला. 

                 
       सकाळापासून परिसरात संततधार पाऊस पडत होता. सकाळीच संजय शिंदे हे शेतात गेले असता ते कांद्याच्या चाळीकडे गेल्यानंतर त्यांना शेडच्या बाहेरून बाजूस आतील बाजूस बिबटयाचे ताजे ठसे दिसले. या भागात  उस पिकांचे मोठे क्षेत्र असल्याने बिबटया उसातच लपून असतो. नदीपात्रही शेजारीच आहे. उक्कलगाव धनवाट परिसर, लम्हाणबाबा शिवारात, बिबटयाचा धुमाकूळ सुरुच आहे. येथीलच अंगणात बिबटयाचे ताजे ठसे सापडले. त्यामुळे, या परीसरात भीतीचे वातावरण पसरले असून देवराम चिंधे, गोरख रजपूत, सोमनाथ कर्डीले यांच्या शेतवस्तीवर बिबटयाने रात्रीत शेळ्या- मेंढ्या कुत्रा कालवडीवर फस्त केल्या आहेत. सायंकाळच्या  सुमारास शिवारातच शेतवस्त्यावर बिबटया  हल्ले चढवित आहे. लम्हाणबाबा शिवारातच शेतातच घास कापत असतानाच तान्हाजी थोरात यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने ते थोडक्यात बचावले होते. शिवार ररत्याने गावात दूध घेऊन जाणार्‍या शेतकर्‍यांवर हल्ले चढवतो गेल्या वर्षभरापासून बिबटयाने हल्ले वाढत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. मागील काही महिन्यांपूर्वीच उक्कलगाव येथीलच जगधने यांच्या शेतातच, चांडेवाडीत शिवारात पिंजरा लावुन मादी बिबटे,  चार बछड्यासह पकडण्यात वनविभागाला यश आले होते. 

             यापुर्वीत कुरणपूर येथीलच दर्शन देठे हा दहा वर्षाच्या चिमुरडा गणपती आरती करून घरी परतत असताना, शेजीरीच दबा धरून बिबटयाने यांच्यावर प्राणघातक हल्ला करत या हल्ल्यात त्याच मृत्यु झाला होता.  गळनिंब शिवारातही तीन वर्षीच्या ज्ञानेश्वरी मारकड मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. गोदावरी नदीत प्रवरा नदीपात्रात परिसरात बिबट्याची दहशत कायमच असल्याची एकंदरीत स्पष्ट झाले. 

          कायमस्वरूपी बंदोबस्त करा 

नदीपात्र परीसरात बिबट्याच्या पावलांची ताजे ठसे निदर्शनात येतात. रात्री दबा बसलेले बिबटे हल्ला चढवितात. हल्ल्यानंतर वनविभाग खडबडून जागे होतात. त्यानंतर पंचनामाही केला जातो.  परंतू, ठोस पावले उचलली जात नसल्याची खंत शेतकर्‍यांनी व्यक्त केली. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबटयाचा कायमस्वरूपी तोडगा काढून बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रकाश थोरात यांनी केली. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post