अवैध धंदे कायमस्वरूपी बंदीसाठी 'श्रीरामपूर ते मुंबई पदयात्रा' ; 'समाजवादी'चे जोएफ जमादार साखळी उपोषणातून एल्गार


श्रीरामपूर : वारंवार उपोषण, निवेदने देऊनही श्रीरामपुरातील गुटखा, मटका, पत्त्यांचे क्लब, सोरट, विनापरवाना दारू विक्री, अवैध ऑनलाईन लॉटरी असे अवैध धंदे पोलीस प्रशासनाने बंद केले नाही. त्यामुळे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी 'श्रीरामपूर ते मुंबई पदयात्रा' काढणार असल्याचे 'समाजवादी पार्टी'चे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी जाहीर केले. उपोषण चालू असतानाही अवैध धंदे चालू असल्याचा आरोप जमादार यांनी यावेळी केला. शहरातील म. गांधी चौकात जमादार यांनी आजपासून (दि.5) साखळी उपोषण सुरु केले आहे. 

उपोषणास विविध पक्ष, संघटनांच्या पाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. शिव स्वराज्य मंचचे संस्थापक सलमान पठाण यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

अवैध धंद्यामुळे श्रीरामपूरची अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात चर्चा होत आहे. मागील काही महिन्यात अवैध धंदे बंद करावे, या मागणीसाठी विविध पक्ष, संघटनांनी अनेकदा उपोषणे, तक्रारी केल्या. परंतु, पोलीस प्रशासनाला अवैध धंदे कायमस्वरूपी बंद केलेच नाही. 'समाजवादी पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष जोएफभाई जमादार हे श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी सतत पाठपुरावा करत असून सोमवारपासून जमादार यांनी साखळी उपोषणास सुरु केले आहे. यापूर्वी जमादार यांनी 22 मार्च 2022 रोजी 4 दिवस आमरण उपोषण केले होते. 

पोलीस प्रशासनाला निवेदन देऊनही अवैध धंदे बंद झाले नाही. श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील सर्वच अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाई करून अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावे.  दि. १० नोव्हेंबर रोजी लेखी निवेदन देऊनही पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे गुटखा,मटका , पत्त्यांचे क्लब,सोरट वगैरे असे विविध प्रकारचे सर्वच अवैध व्यवसाय हे सर्रासपणे खुलेआम सुरुच असल्यामुळे नाईलाजाने आज (दि.०५ ) पासून मेनरोडवरील म. गांधी यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले. निवेदनाच्या प्रति वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आल्या आहेत.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post