श्रीरामपुरात अजून किती जीव जाणार?? रस्त्यावरील अतिक्रमन त्वरित हटावा; 'भीम गर्जना' संघटनेचा आंदोलन छेडण्याचा इशारा


श्रीरामपूर : शहरातील संगमनेर रोडवरील अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा 'भीम गर्जना' संघटनेचे संस्थापक फिरोजभाई पठाण यांनी दिला आहे. या ठिकाणी नुकताच एका युवकाचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत 'भीम गर्जना' संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

पालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी व मुखयाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून रस्त्यालगत वाढलेल्या अतिक्रमणामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होतात आणि निष्पाप लोकांचा जीव देखील जातो. नॉर्दन ब्रांच ते दत्तनगर टपरी धारकांनी अतिक्रमण केलेले असून रस्त्याच्या कडेला गाड्या लावल्या जातात. गाड्यांचे काम देखील रस्त्यावरच केले जाते. त्यामुळे रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. येथे नुकताच एका युवकाचा अपघात होऊन जीव गेल्याची घटना घडलेली आहे. हा अपघात रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणामुळे झाल्याचे निदर्शनात येते. अतिशय वर्दळीचा रस्ता असताना अनेक व्यापारी आणि गॅरेज व्यवसायीकनी आपले दुकाने दहा ते पंधरा फूट पुढे आणल्याने त्यांच्याकडे येणारी ग्राहक रस्त्यावर गाड्या लावत असल्यामुळे यापूर्वीही अनेक छोटे मोठे अपघात होऊन अनेक नागरिकांना आपला जीव गमवा लागला आहे.  तरीदेखील प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची कोणतीही दखल घेतलेली नसून पुढील दहा दिवसांच्या संपूर्ण संगमनेर रोडवरील अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावी, अन्यथा भीम गर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने विविध प्रकाराचे आंदोलन उपोषणे रस्ता रोको करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर निवेदनाच्या प्रति पाठविण्यात आल्या आहेत.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post