साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 जून 2020
बेलापूर | प्रतिनिधी |लग्न समारंभासाठी बेकायदा मंडळी जमवुन जिल्हाधिकारी अहमदनगर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल बेलापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन श्रीरामपूर तालुक्यातील हा पहिलाच गुन्हा आहे.
याबाबत बेलापूर खूर्द येथील पोलीस पाटील युवराज गोरक्षनाथ जोशी यांनी, बेलापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. सरपंच अनुराधा गाढे ग्रामसेवक चंद्रकांत तुंभारे कामगार तलाठी विकास शिंदे, अनिल गाढे, सुनिल बारहाते, उमेश बारहाते आदींची ग्रामस्तरावर कोरोना कमीटी असुन मी सचिव म्हणून काम पहात आहे. आज साकाळी अकरा वाजता श्रीहरिहर केशव गोविंद बन ट्रस्टच्या हाँलमध्ये चालू आसलेल्या लग्न समारंभात कुठल्याही नियमांचे पालन न करता चार पाचशे लोक एकत्र आल्याचे समजताच कोरोना १९ कमीटीचे सर्व जण सदर ठिकाणी जावुन समक्ष पहाणी केली असता सदर कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन आली. त्यावेळी केशव गोविंद बन ट्रस्टचे पदाधीकारी यांनी लग्न समारंभास परवानगी देताना कोरोनाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून कुठलीही सुविधा उपलब्ध करुन दिली नाही तसेच लग्न समारंभाच्या वेळी ट्रस्टचे कुणीही पदाधीकारी उपस्थित नव्हते गळनिंब येथील मुलगी व सडे तालुका राहुरी येथील नवरदेव यांचा विवाह पार पडत असताना मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली या बाबत कमीटीने विचारणा केली आसता काहींनी आम्ही रोख पैसे मोजले असल्याचे सांगितले या बाबत कमीटीने ट्रस्टच्या पदाधीकार्याशी संपर्क साधला असता दोन तास कुणीही आले नसल्याचे कोरोना कमीटीचे म्हणणे आहे. ट्रस्टने कार्यक्रमाची सुपारी घेतल्या नंतर तेथे थांबणे आवश्यक होते ; परंतु तसे न करता ट्रस्टचे अध्यक्ष सचिव यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाय योजना न करता हाँल भाडे घेवुन कार्यक्रमासाठी दिली तसेच नवरदेव नवरीचे आई वडील यांनी लग्न समारंभासाठी १०० ते १५० पेक्षा जादा लोक एकत्र जमवुन मा जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर यांचेकडील कोरोना (१९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुशंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना पत्रक / आदेश क्रDC/कार्या/९ब१/२०२०दिनांक३१मे२०२० अन्वये तसेच क्रआव्यमपू/कार्या१९अ/५९२/२०२०अहमदनगर दिनांक २जुन २०२० यांचे आदेशाचे उल्लंघन केले बाबतची फिर्याद देण्यात आली असुन या फिर्यादीमुळे वर्हाडी मंडळीची धांदल उडाली कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने कठोर उपाय योजना केली असली तरी ग्रामस्थ मात्र कोरोना बाबत फारसे गंभीर दिसत नसल्याचे समोर आले आहे.
Tags
क्राईम