नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गरिबांना 1.70 लाख कोटीचे पॅकेज ; अर्थमंत्री निर्मला सीतारमण

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत 
गरिबांना 1.70 लाख कोटीचे पॅकेज;अर्थमंत्री निर्मला सीतारमण

साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 मार्च 2020

नवी दिल्ली :  कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांच्या विमा कवच मिळणार आहे. तसेच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1.70 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत आज ( दि. 26)  केली.

  
  
            सध्याच्या परिस्थितीत एकही गरीब उपाशी राहू नये, यासाठी सरकारने व्यवस्था केल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे दोन प्रमुख भाग करण्यात आले आहेत. पहिल्या भागात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटी गरिबांना कवच मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पुढील तीन महिन्यांपर्यंत गरिबांना 5 किलो अतिरिक्त गहू किंवा तांदूळ मोफत मिळणार आहे. याचा फायदा 80 कोटी लोकांना होणार आहे. याशिवाय एक किलो डाळ मोफत मिळणार आहे. योजनेअंतर्गत आठ विभागांमध्ये शेतकरी, मनरेगा, गरीब विधवा-निवृत्त कर्मचारी-दिव्यांग, जनधन योजना-उज्ज्वला योजना, सेल्फ हेल्प ग्रुप (महिला), ऑर्गनाइज्ड सेक्टर वर्कर्स (EPFO),कन्स्ट्रक्शन वर्कर्स यांना डीबीटीला फायदा मिळणार आहे. वयोवृद्ध, दिव्यांग आणि विधवांना पुढील तीन महिन्यात 1000 रुपये दोन हफ्त्यात दिले जाणार आहेत.


वैद्यकीय कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं कवच
आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधितांची काळजी घेणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आभार मानले. अर्थमंत्री म्हणाल्या की, कोरोनाच्या लढाईत आघाडीवर लढणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना 50 लाखांच्या विम्याचं कवच सरकार देणार आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, इतर वैद्यकीय कर्चाऱ्यांचा समावेश आहे. याचा फायदा 20 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

शेतकरी, गरिबांसाठी 
8.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एप्रिलच्या पहिल्यात आठवड्यात 2000 रुपयांचा हफ्ता दिला जाईल, जेणेकरुन तातडीने फायदा मिळायला सुरुवात होईल.देशात मनरेगा योजनेचा फायदा पाच कोटी कुटुंबांना मिळतो. मनरेगाचे मजुरी आता 182 रुपयांनी वाढवून 202 रुपये करण्यात आली आहे.जनधन योजनेत सुमारे साडे 20 कोटी महिलांच्या खात्यात पुढील तीन महिन्यांपर्यंत डीबीटीद्वारे प्रत्येक महिन्यात 500 रुपये ट्रान्सफर केले जाणार आहेत.सुमारे 8.3 कोटी बीपीएल कुटुंबांना उज्ज्वला योजनेअंतर्गंत 3 महिन्यांपर्यंत मोफत एलपीजी गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत.ज्या कंपन्यांमध्ये 100 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, त्यामधील ₹15 हजार पेक्षा कमी पगार असणाऱ्याचा पीएफ पुढील तीन महिने सरकार भरणार आहे. 80 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post