श्रीरामपूर जिल्हा निर्मितीसाठी 'श्रीरामपूर भाजपा' मंत्री विखेंना निवेदन देणार


श्रीरामपूर : सुरूवातीपासून श्रीरामपूरच जिल्हा व्हावा, ही मागणी श्रीरामपूर भाजपाची असून त्यासंबंधी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे. शिवाय शिर्डी येथे होऊ घातलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचा प्रस्ताव रद्द करून ही कार्यालये श्रीरामपूररातच व्हावीत, अशी मागणीदेखील या निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष मारूती बिंगले यांनी दिली आहे.

          प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्याचे विभाजनाची आवश्यकता अनेक वर्षांपासूनच आहे. सुरूवातीपासूनच जिल्ह्याचे केंद्रस्थान श्रीरामपूर असल्याची चर्चा होती. शिवाय श्रीरामपूर शहरात आरटीओ कार्यालय, एसटी कार्यशाळा,प्रांत कार्यालय, ग्रामिण रूग्णालय, रेल्वे स्थानक अशी महत्वाची कार्यालयांची स्थापना झाली असल्याने गुणवत्तेच्या आधारावर श्रीरामपूर हेच जिल्ह्याचे ठिकाण होण्यास योग्य आहे.

          मात्र दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होणाऱ असल्याचे जाहीर केल्यानंतर या विषयाला पुन्हा तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी एकत्र येत आज दि. 17 रोजी श्रीरामपूर बंदची हाक दिली. श्रीरामपूर भाजपाच्यावतीनेदेखील या बंदला पाठींबा जाहीर करण्यात आला असून आम्ही श्रीरामपूरकरांच्या भावनांसोबतच असल्याचे बिंगले यांनी सांगितले. याबाबत ना. विखे यांना निवेदन दिले जाणार आहे. त्यांच्याकडे रितसर मागणी करून श्रीरामपूर हाच जिल्हा व्हावा यासाठी विनंती करणार असल्याचे बिंगले म्हणाले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post