श्रीरामपूर जिल्ह्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचा मंत्री विखेंकडे आग्रह

श्रीरामपूर जिल्ह्याची आग्रही मागणीचे निवेदन महसुलमंत्री, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देताना जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, श्रीरामपूर भाजपचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे, शहराध्यक्ष मारूती बिंगले, गणेश राठी आदी दिसत आहेत.

श्रीरामपूर : श्रीरामपूर जिल्हा झाला पाहीजे हि १९८० च्या दशकापासून गेली ४३ वर्षे सर्व श्रीरामपूरकरांची मागणी आहे. जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रमुख कार्यालये श्रीरामपूर येथे आहेत. त्यात आणखी भर पडून श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आवश्याक असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उत्तर विभाग कार्यालय संगमनेर येथून श्रीरामपूर येथे स्थलांलरीत करावे, संगमनेरचे प्रस्तावित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रद्द करावे, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथे मंजूर करावे या मागण्यांसह श्रीरामपूर जिल्हा व्हावा व्हावा, या मागणीचे निवेदन महसुलमंत्री, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, श्रीरामपूर भाजपचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे, शहराध्यक्ष मारूती बिंगले, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्यासह श्रीरामपूरच्या पदाधिका-यांनी दिले. 

       यावेळी बोलताना नामदार विखेंनी, शासन स्तरावर सध्या जिल्हा विभाजनाचा कोणताही विषय नसून जिल्हा विभाजनाचा निर्णय घेताना सर्व बाबी तपासून निर्णय होतील असे स्पष्ट करत शिर्डी जिल्हा होणार या अफवेची हवा काढून घेतली. सध्या श्रीरामपूरात राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा कुटील डाव काही राजकारणी करत असल्याचे परखड मत व्यक्त केले. श्रीरामपूरची बाजू मांडताना केतन खोरे यांनी जिल्ह्याच्या अनुषंगाने प्रशस्त असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, शहरालगत उपलब्ध शेती महामंडळाची जागा, अतिरिक्त नगर रचना कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, रेल्वे स्थानक, एमआयडीसी, जिल्हा सत्र न्यायालयामुळे पायाभरणी श्रीरामपूर येथे झालेली असल्याची माहीती दिली. तर दिपक पटारे व मारूती बिंगले यांनी गेल्या ४३ वर्षात नव्हे इतकी महत्वपुर्ण महसुल खात्याचा कारभार आपल्याकडे आला असल्याने श्रीरामपूर जिल्हा होण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून आपण श्रीरामपूर जिल्ह्याचे सर्वांचे स्वप्न साकार करावे अशी आग्रही मागणी केली. 

यावेळी नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, सुनिल वाणी, माजी नगरसेवक दिपक चव्हाण,  रवी पाटील, विठ्ठल राऊत, मंजूषा ढोकचौळे, सुनिल साठे, मनोज नवले, अभिषेक खंडागळे, बंडूकुमार शिंदे, पूजा चव्हाण, पुष्पलता हरदास, दत्ता जाधव, रूपेश हरकल, गौतम उपाध्ये, मिलींदकुमार साळवे, अजित बाबेल, बाबासाहेब साळवे, विजय आखाडे, विशाल यादव, अक्षय वर्पे, नितीन ललवाणी, महेंद्र पटारे, विशाल अंभोरे, बाळासाहेब हरदास, योगेश ओझा यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post