श्रीरामपूर : सोमवारी रात्री अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या कारेगाव , वांगी येथील शेत शिवारातील नुकसानग्रस्त गहू,मका, कांदा पिकाची पाहणी पंचायत समितीच्या सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी केली.
यावेळी त्याच्या समवेत माजी चेअरमन रमेशआण्णा उंडे, भरत जाधव तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते. तात्काळ सरसकट पंचनामे करण्याची विनंती तहसीलदार, कृषी अधिकारी याना भ्रमणध्वनी वरून केली.