एसएससी/एचएससी उत्तीर्ण, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, सर्व शाखेतील पदवीधारक, जीएनएम/एएनएम, ओटी कोर्स, बीएचएमएस, बीएएमएस, एमबीबीएस ही शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. सदर मेळाव्यामध्ये एकूण १०८२ रिक्त पदे असून जिल्ह्यातील २५ नामांकित उद्योजक व आस्थापना सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करणार आहेत.
उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर आपली नांव नोदणी करून पात्रतेनुसार उद्योजकाकडे अप्लाय करावे. किंवा https://forms.gle/cWciyZz5R1kzGxwZ7 या लिंकवर रोजगार मेळाव्यासाठी नांव नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०२४१-२९९५७३५ किंवा रोजगार मेळावा समन्वयक तौसिफ सौदागर( मो. नं.९८८१६ ६५१११) स्वप्नील ठाणगे (मो. नं. ९८२२१८१११४) व श्री. बद्रिनाथ आव्हाड (मो.नं. ९४२०७२५२८०) यांच्याशी संपर्क साधावा.
तरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पुर्ण करुन रोजगाराच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ही श्री.सुर्यवंशी यांनी केले आहे.