पाच-पाच दिवस उपोषण होऊनही श्रीरामपुरात अवैध धंदे सुरूच... अवैध धंदे बंद करा; 'भीमगर्जना'चे पोलीस प्रशासनाला निवेदन


श्रीरामपूर ( राजेश बोरुडे ) : श्रीरामपूर तालुक्यात अवैध धंद्याना ऊत आला असून, पोलीस प्रशासन नेमकं करतंय काय? असा संतप्त सवाल उपस्थित होऊ लागला आहे. तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागण्या संघटना करू लागल्या आहेत. 'भीमगर्जना' संघटनेने तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात 'भीमगर्जना'ने पोलीस प्रशासनाला निवेदन दिले असून, आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मटका, पत्त्याचे क्लब, दारू, गुटखा अशा अवैध धंद्याचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. अवैध धंदे बंद व्हावी, यासाठी अनेक पक्ष, संघटनांनी निवेदने दिली. आंदोलने केली. उपोषनेही केली. परंतु, रहाडगाडगं आहे तसंच. काही दिवसापूर्वी एका संघटनेने शहरातील गांधी चौकात चार-पाच दिवस उपोषणही केले. दरम्यानच्या काळात अवैध धंदे काही दिवस बंदही झाले. नंतर 'वातावरण' शांत झाले. पुन्हा 'अवैध धंद्यात धंदे' सुरु. मंग, उपोषणातून काय सिद्ध झाले?? उपोषण नेमके कशासाठी व कोणासाठी होतात? पोलीस प्रशासन आपला 'पॉवर' दाखवून अवैध धंद्याना जरब बसवील, अशी भोळीभाबडी अपेक्षा जनसामन्यांच्या मनात खदखद करत आहे. 

       'भीमगर्जना' संघटनेने पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहेत. मटका, पत्त्याचे क्लब, दारू, गुटखा व इतर अनेक अवैध धंदे श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. चोऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. यावर पोलीस खाते हेतूपूरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. अवैध धंद्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. दारू, मटका मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तरुण पिढी वाया जात आहे. अनेकांचे संसार धुळीस मिळत आहे. दारू गुत्यामुळे दारुड्यांचे व गुन्हेगारीचे प्रमाण तालुक्यात वाढले.

          श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांत आठ दिवसाच्या वरील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करावे व त्यांच्यावर मोक्का लावून कारवाई करावी, अन्यथा 'भीमगर्जना' संघटनेच्यावतीने आमरण उपोषण व उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी उपस्थित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पठाण, महाराष्ट्र अध्यक्ष शिवाभाऊ साठे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रवीण साळवे, श्रीरामपुर तालुकाध्यक्ष रफिक शहा, तालुका उपाध्यक्ष सोनू शेख, महासचिव मोहन शेख, विभाग प्रमुख बाळासाहेब गुडेकर, तालुका युवक अध्यक्ष अतिक शेख, सचिन बनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post