डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना शासन करा ; 'भीमगर्जना' संघटनेचे पोलीस महानिरीक्षकांना निवेदन : श्रीरामपुरात निषेध


श्रीरामपूर : अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर व यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा या दोन्ही ठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर काही समाजकंटकांनी काळी शाई टाकून विटंबना केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करून हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून शासन करावे, अशी मागणी 'भीमगर्जना' संघटनेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात पोलीस महानिरीक्षकांना श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.


               'भीमगर्जना' संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेमुळे भारत देश लोकतंत्र आहे.  त्यांचे या भारत देशावर मोठे उपकार आहे. ज्या देशात आपल्याला स्वातंत्र्य, बंधुता, समता व लोकशाही मार्गाने ज्या महापुरुषामुळे राहण्याची वावरण्याची संधी मिळाली, अशा महापुरुषांची विटंबना होणे अत्यंत निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून शासन करावे. अशी मागणी करून भिम गर्जना संघटनेच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.


               यावेळी उपस्थित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोजभाई पठाण, महाराष्ट्र अध्यक्ष शिवाभाऊ साठे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष कांगणे पाटील, अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अकबर शेख, श्रीरामपुर तालुकाध्यक्ष रफीक शहा, श्रीरामपूर तालुका युवा अध्यक्ष अतिक शेख, शहर युवा अध्यक्ष रफिक पठाण, शहर संपर्क प्रमुख सचिन बनकर, बाळासाहेब गुडेकर, मुबारक शेख, बुराभाऊ धीवर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post