साईकिरण टाइम्स | १३ जानेवारी २०२१
श्रीरामपूर शहरासह परिसरात मागील काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढलेले असून, अशा भुरट्या चोरांचा वेळेत बंदोबस्त करण्याची मागणी 'मनसे'च्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनकडे बुधवारी (दि.१३) निवेदन देऊन केली आहे. ८ ते १० दिवसांत दुचाकी चोरांचा बंदोबस्त न झाल्यास चोरीस गेलेल्या मोटारसायकल धारकांच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव तुषार बोबडे, जिल्हा सरचिटणीस डॉक्टर संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, शहराध्यक्ष गणेश दिवसे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल शिरसाठ, शहर संघटक निलेश सोनवणे, तालुका सरचिटणीस गोरक्षनाथ येळे, शहर सरचिटणीस रोहित जोंजाळ, तालुकाध्यक्ष भास्कर सरोदे, कामगार सेनेचे नंदू भाऊ गंगावणे, विद्यार्थी सेना तालुका सचिव विकी राऊत, विद्यार्थी सेना तालुका संघटक आतुल तारडे, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब भालेराव, लखन कडवे, ज्ञानेश्वर काळे, मृत्युंजय रुद्राक्ष, विद्यार्थी सेना शहर सरचिटणीस संकेत शेलार, उपशहर अध्यक्ष रतन वर्मा, प्रमोद शिंदे, विभागाध्यक्ष मारुती शिंदे, बजरंग शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'मनसे'च्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, गोंधवणीसह शहरातील इतर भागांत मोटारसायकल व इतर छोट्यामोठ्या चोऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कष्टाने पै-पै जमा करुन वाहन खरेदी करणा-या गोरगरिबांचे लोकांचे आर्थिक नुकसान होत आहे. असे असतांना त्या भागातील पोलीस कर्मचारी दिवसा व रात्री त्यांचे डयुटीचे वेळेस गस्त घालताना दिसून येत नाहीत. यामुळे चोरांवर पोलीसांचा वचक राहिला नसल्याने भुरटे चोर रात्र असो वा दिवस चोरी करण्याची हिम्मत दाखवत असतात. चोरी गेलेल्या मोटारसायकलांची कसून तपास करावा. मोटारसायकल सापडत नसल्यास त्या भागातील पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना जबाबदार धरुन त्यांचेविरुध्द देखील कर्तव्यात कसूर केले म्हणून कारवाई करण्यात यावी असेही निवेदनात म्हंटले आहे.