यासंदर्भात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे कि, दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी, दलाल, भूमाफिया यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार सुरु आहे. यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत असून, शासनाचा महसूल बुडत आहे. कोणताही दस्त कायदेशीर पद्धतीने नोंदवण्यासाठी नागरिकांकडून निर्धारित मुद्रांक शुल्काव्यतिरिक्त मोठी लाच घेतली जाते. ही लाच दलालांच्या माध्यमातून स्वीकारली जाते, जे दुय्यम निबंधकांच्या आशीर्वादाने कार्यालयात बिनधास्त वावरतात, असा आरोपही राजेश बोरुडे, शिवाजी दांडगे, सुधीर तुपे यांनी केला आहे. नियमानुसार आवश्यक असलेली कागदपत्रे असतानाही, अनेक दस्तांची नोंदणी हेतुपूरस्पर नाकारली जाते. यासाठी अनावश्यक त्रुटी दाखवल्या जातात. नंतर, याच दस्तांची नोंदणी दलालांना पैसे दिल्यावर नियमबाह्य पद्धतीने केली जाते. यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
या कार्यालयात बनावट कागदपत्रे वापरून अनेक बोगस दस्तनोंदणी झाल्याचा संशय आहे. यामुळे शासनाची फसवणूक होत असून, जमिनीच्या मूळ मालकांचे हक्क धोक्यात आले आहेत.
दुय्यम निबंधक आणि त्यांच्याशी संबंधित दलाल यांनी या गैरव्यवहारातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर संपत्ती जमा केली आहे. याची सखोल चौकशी करावी.
२) गेल्या तीन वर्षांत दुय्यम निबंधक, श्रीरामपूर कार्यालयात झालेल्या सर्व दस्तनोंदणीची विशेष तपासणी पथकाकडून तपासणी करावी आणि बोगस आढळलेल्या नोंदी रद्द कराव्यात.
3) दुय्यम निबंधक व दलालांनी मिळवलेल्या बेकायदेशीर संपत्तीची चौकशी करून ती जप्त करण्याची कारवाई करावी.
4. दुय्यम निबंधक कार्यालयात पारदर्शकता आणण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांचे थेट फुटेज कार्यालयात दर्शनी भागात प्रदर्शित करावे.