शहरात नगरपालिकेच्या अनेक शाळा असून त्यातून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळांमध्ये एलईडीचा वापर व नवनवीन अत्याधुनिक शैक्षणिक उपक्रम राबविले जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक अभिरुची निर्माण होत आहे. मुला-मुलींना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शूज, शालेय पोषण आहार, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, शिष्यवृत्ती योजना, इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती योजना, अतिरिक्त व पूरक आहार योजना अशा अनेक योजनांचा लाभ विद्यार्थी घेत आहेत.
आतापर्यंत शिक्षण हक्क कायद्यानुसार, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत 25 टक्के आरक्षित जागेवर प्रवेश मिळत होते. परंतु, राज्य सरकारने या कायद्यात आता बदल केला आहे. नव्या नियमानुसार आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या खासगी शाळेपासून एक किलोमीटर परिघात सरकारी किंवा सरकारी अनुदानीत शाळा असल्यास या शाळांमध्ये प्राधान्याने प्रवेश घ्यावा लागेल.