खरिपाच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी एक लाखाची मदत दया ; शेतकरी संघटनेची मागणी


श्रीरामपूर : काढणीला आलेल्या खरीप पिकाचे अतोनात नुकसान होत असून नैसर्गिक आपत्ती निवारण निधीतून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत राज्य शासनाने करावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या शिस्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना केली. याबाबत श्रीरामपूरचे नायब तहसीलदार श्री वाघचौरे  यांचेकडे जेष्ठ कार्यकर्ते बबनराव उघडे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, ता. अध्यक्ष श्रीरामपूर युवराज जगताप, ता अध्यक्ष राहुरी नारायण टेकाळे, ता. अध्यक्ष राहता योगेश मोरे, ता. अ. नेवासा हरिभाऊ तुवर, ता. अ. कर्जत कर्जत रणजित सुल, शरद पवार, नारायण पवार, कडू पवार, सागर वर्पे, सतीश.मोरे आदीनी सहभाग नोंदविला.


         खरीप हंगाम ऑक्टोबर  2022 मध्ये जिल्ह्यत सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, भुईमूग आदी पिकांना यलो मोझॅक नावाच्या विषाणूचा प्रार्दुरभाव झाला. अश्या परिस्थितीत काढणीला आलेल्या आलेल्या खरीप पिकांना परतीच्या पावसामुळे नुकसान होत आहे. सोगनी झालेल्या पिकात पावसाचे पाणी साचलेमुळेही नुकसान झाले आहे. महसूलच्या इ पिक पेरा नोंदीतील अडचणी मुळे शेतकऱ्यांना नोंदी करता आलेल्या नाही. त्यामध्ये प्रामुख्यने सरोवर डाऊन आसने, व्हर्जन एक नंतर व्हर्जन टू ऍप माहीत नसणे अश्या अनेक अडचणीमुळे इ पिक पेरा पन्नास टक्के रखडला. वास्तविक शासनाच्या महसूल, ग्रामविकास व कृषिविभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कार्यशाळा घेणे गरजेचे होते व आजही आहे. तरी राहिलेल्या पिकाच्या नोंदी घेऊन नुकसानीचे पंचनामे करावे. 

राज्यातील अस्तित्वात असलेले सरकार व विरोधी पक्ष शेतकऱ्याच्या प्रति अक्रियाशील व असंवेदनशील असलेचे दिसून आले. मागील केलेल्या दोन्हही कर्जमाफी योजनामध्ये शेतकऱ्याची फसवणूक झालेली दिसून आली. सरकार व विरोधक शेतकरी समस्या जाणून घेणेसाठी  शेतकऱ्याचे मेळावे घेण्याऐवजी मुबईत दसरा मेळावे घेणेत धन्यता मानत आहे. कोरोनाचे संकट टळून दोन वर्ष होत आली परंतु ग्रामिण बस सेवा पूर्ववत केली नाही त्यामुळे ग्रामीण मुला -मुलींना महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवासाच्या प्रचंड अडचणी निर्माण होत असताना मंत्रीच जर शेकडो बसेस बुक करून ग्रामिण दळण वळण विस्कळीत करून  'एक दिवसाने काय फरक पडतो ' अशी बेजबाबदार विधाने करतात. मंत्री प्रश्न सोडविण्याऐवजी प्रश्न निर्माण करतात तर सामान्यांनी काय करावे. 

तरी शासनाने खरिपाच्या नुकसानी पोटी हेक्टरी एक लाख रु. मदत दीपावली पूर्वी दयावी तसेच ग्रामिण भागातील बस सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post